vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

 

राज्य प्रतिनिधी-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, वनवृक्ष बियाणे प्रदर्शन, सीड बॉल निर्मिती तसेच “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

🌳 यानिमित्त मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तथा मा. वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त श्री. गजेंद्र हिरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निवास परिसरातील “सजिरी उद्यान” येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अपर्णा पाटील तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध शाळांमधील इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक, महिला बचत गट सदस्य आणि नागरिकांना वृक्षांचे महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

🌿 नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायत परिसर, शाळा, अंगणवाडी केंद्र, न्यायालय परिसर, रोपवाटिका तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

🌾 यासोबतच सिसम, कांचन, आवळा, अंजन, कुसुम, बेहडा, बेल, खैर, बाभूळ, मोहगणी आणि महारुख यांसारख्या विविध वनवृक्षांच्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अक्कलकुवा येथे बेहडा बियाण्यांपासून सीड बॉल निर्मिती उपक्रम राबवून भविष्यातील हरित संवर्धनासाठी प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले

 

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा-भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा सहभाग चांगला राहिला आहे, दुपारी ३:०० वाजेपर्यंत १२२ मतदारसंघांमध्ये अंदाजे ६०.४०% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर