vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यशस्वी प्रतिसाद

महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यशस्वी प्रतिसाद

 

              रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत 2025-26 हंगामात राज्यातील 56 समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 1 हजार 724 कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली. या घरट्यांमधील तब्बल 1 लाख 08 हजार 596 कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले असून, एकूण उबवण यशाचे प्रमाण 61.20 टक्के नोंदविण्यात आ   महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदविण्यात आली असून, त्यामधून 54 हजार 227 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53 हजार 325 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले असून, 69.95 टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदविण्यात आले. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1 हजार 44 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.  Ĥ    यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातील आरावी, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे/पानंदे आणि कचरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी आणि कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांची घरटी नोंदविण्यात आली. यावरून महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या प्रजननासाठी अजूनही महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे अधोरेखित होते.

        सन 2018 पासून कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या सहकार्याने मच्छीमारांसाठी नुकसानभरपाई योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांसह इतर संरक्षित समुद्री प्राण्यांना जाळे कापून जीवनदान देणाऱ्या मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यात येते. आतापर्यंत महाराष्ट्रात 486 समुद्री कासवांना वाचविण्यात मच्छीमार आणि वन विभागाला यश मिळाले असून, त्यासाठी मच्छीमारांना एकूण सुमारे 61 लाख 21 हजार 850 रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे

       त्याचप्रमाणे, समुद्री कासवे इजा किंवा संसर्गामुळे अनेकदा समुद्रकिनाऱ्यांवर जखमी अवस्थेत आढळतात. अशा कासवांची संख्या पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येते. जिवंत कासव किनाऱ्यावर वाहून आल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कांदळवन कक्षामार्फत ‘मरीन रिस्पॉन्डंट गट’ स्थापन करण्यात आला आहे. या गटात महाराष्ट्र वन विभागाचे कर्मचारी (वनपरिक्षेत्र अधिकारी), कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा समावेश आहे.

    सन 2011 पासून वाईल्डलाइफp कन्झर्व्हेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग (डहाणू विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे समुद्री कासवांसाठी उपचार व पुनर्वसन केंद्र चालविण्यात येत आहे. तसेच कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबई व परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर आढळणाऱ्या जखमी कासवांच्या उपचारासाठी ऐरोली येथे कासव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही तात्पुरती उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

 

0000000

संबंधित पोस्ट

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजीस्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१सरपंचांचा सक्रीय सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती द्या; जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला