vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

 

रायगड-अलिबाग,( प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग दि. 24 व 25 जून 2026 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी दिले आहेत.

दि. 23 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे महादरवाजा जवळील पायरी मार्गावर दरड कोसळून मार्ग बंद झाला आहे. संबंधित विभागाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तहसीलदार महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांना नाणे दरवाजा, चित्त दरवाजा तसेच किल्ले रायगड परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने पर्यटकांना या कालावधीत पायरी मार्गाचा वापर न करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51, 54 व 56 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

००००

संबंधित पोस्ट

बँकॉकला शक्तिशाली भूकंपाचा धक्का! इमारती कोसळल्या, लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा घाबरून पळून गेले, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सागिंगजवळ…

अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत एकाच वेळी २,४७०.९७ कोटींची भरपाई प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू)कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्र्यांनी शिर्डीत घेतला जनता दरबार

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

धरणातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी यांचे निर्देश

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्यविद्यापीठात-‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची घोषणा