
मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी…
नवी दिल्ली – प्रतिनिधी-
संसदीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
खासदार नरेश म्हस्के हे निवडून आल्यापासून मुंबई आणि ठाणे उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी संसदेत आवाज उठवत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी संसदेचे कामकाज गोंधळ घालून ठप्प केले आहे. आज खासदार नरेश म्हस्के यांना संसदेत बोलायची संधी मिळताच त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासावर आवाज उठविला.



