vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या या मागणीसाठी शहरजिल्हा काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेला जोरदार सुरुवात…प्रत्येक वार्डात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल- शेख महेमूद

सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या या मागणीसाठी शहरजिल्हा काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेला जोरदार सुरुवात…प्रत्येक वार्डात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल- शेख महेमूद

 

जालना (प्रतिनिधी)- सर्व निवडणुका मतपत्रिका (बॅलेट) पेपरवर घेण्यात याव्यात या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वाक्षरी मोहीम सुरु करण्याचा आदेश जारी केल्याने आज गुरुवार रोजी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. जालना शहरात गुरुवार रोजी खा . डॉ. कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पक्ष कार्यालय रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये सामान्य नागरिकांनी उत्स्फुर्त भाग घेतला. ही मोहीम दि.20 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

यावेळी बोलतांना जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगीतले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लीकार्जुन खरगे यांनी इव्हीएम मशीन हटवून मतपत्रिका (बॅलेट) पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी केंद्रिय निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसपक्ष राज्यात या बाबतीत स्वाक्षरी मोहीम राबवून राज्यात प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने स्वाक्षरीचे निवेदन देणार आहे. शेख महेमुद पुढे म्हणाले की, शहरातील प्रत्येक वार्डात ही मोहीम राबविण्यात येणार असून, काँग्रेस आघाडी व सर्व सेलचे पदाधिकारी यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. यावेळी माजी गटनेते गणेश राऊत यांनी बोलतांना सांगीतले की, शहरातील झोपडपट्टी भागात ही स्वाक्षरी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल.

या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार, शहराध्यक्ष वैभव उगले, माजी नगरसेवक अशोक नावकर, अ.बासेत कुरेशी, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष जावेद बेग, बळीराम तिडके, जिल्हाध्यक्ष प्रमोद अल्हाट, निलेश दळे, सुरज एन्गटवाड, जावेद शेख, इम्रान बिल्डर, गणेश चांदोडे, खालेद मशायक, सुनिल सोनवणे, शेख शकील, शेख रफीक, वसिम कादरी, सिराज पटेल, बाबासाहेब सोनवणे, अनसार कुरेशी, सय्यद अलताब, भगवान कावळे, अलीअहमद आदि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश चांदोडे यांनी केले.

संबंधित पोस्ट

गाळपेर जमिनीवर चारा उत्पादनासाठी लाभार्थी निवडीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्जमागणी

vishwatmaklokswamivarta

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी व युवकांसाठी नव्या योजना मंजूर

जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवावी–जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्या- जिल्हाधिकारी स्वामी     

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणार विशेष स्वयंसेवकाची मदत

vishwatmaklokswamivarta

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta