vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

 २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

 

राज्य प्रतिनिधी –

औरंगाबाद- काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी डॉ. बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर करण्यात आले की, सन २०२५-२०२६ वा शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षण घेण्यासाठी २५% (RTE) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि.१४/०१/२०२५ ते २७/०१/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. परंतु अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास पालकांची चांगलीच दमछाक होत आहे. तसेच अर्जदारास अर्ज करतांना स्वतःच्या घराचे गुगल लोकेशन (Google Location) अचूक टाकावे लागत आहे. परंतु अर्ज करतांना संकेतस्थळ वारंवार हँग होऊन गुगल लोकेशन (Google Location) बरोबर दर्शविले जात नाही त्यामूळे पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. तसेच भरपूर प्रमाणामध्ये अर्जदार अद्यापही अर्ज भरण्यास राहिलेले आहे.

डॉ बी.बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सर्व परिस्थितीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% ऑनलाईन (RTE) अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी सय्यद अशफाक अली, शेख इमरान यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्मिरात कुलगाम इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत, तीन दशतवादी ठार, शोध मोहीम सुरू.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

विशेष वृत्त :सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे पीडित महिलांच्या हक्काचा आधारवड

♦️आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठुरायाचं २४ तास दर्शन सुरु.

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी