vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

 

राज्य प्रतिनिधी

 महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 ते 60 भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे सध्या संपूर्ण कुंभमेळा परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे

मिळालेल्या माहितीनुसार,प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा  2025) सुरू आहे. गंगा-यमुना-सरस्तवी संगमावर मौनी अमावस्येच्या रात्री करोडो भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. यादरम्यान 29 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनूसार, या घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 ते 80 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेवर मोदी यांनी दुख: व्यक्त केले. ट्विटद्वारे त्यांनी भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, ‘प्रयागराज महाकुंभात घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. घटनेत ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. सर्व जखमींची प्रकृती लवकर ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे. मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले

संबंधित पोस्ट

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

बीड जिल्ह्यातील  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल –

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

बम बम भोलेनाथ बाबा अमरनाथ यात्रेची नोंदणी येत्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

vishwatmaklokswamivarta