शेतकऱ्यांच्या आंदोलनाला व्यापारी महासंघाचा पाठींबाआज व्यापाऱ्यांनी पुकारला बंद..
जालना (प्रतिनिधी) ः नांदेड – जालना समृद्धी महामार्गासाठी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरकारने मूल्यांकन अत्यंत कमी काढले असून संपादित होणाऱ्या जमिनीचे बाजारभावाने मूल्यांकन काढून ते मिळावे या मागणीसाठी देवमूत येथे शेतकरी उपोषणास बसले आहे. त्यांच्या या उपोषणास जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे संपूर्ण समर्थन असून त्यांची मागणी सरकारने गंभीरतेने घेऊन त्यांना त्यांच्या संपादित होणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना 5 फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा घेतलेला निर्णय मागे घेण्यास प्रवृत्त करावे असे व्यापारी महासंघ सरकारकडे कळकळीची विनंती करत आहे. महामार्गासाठी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीस योग्य भाव मिळावे यासाठी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून उद्या जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने पूर्ण व्यापार बंदचे आव्हान करण्यात येत आहे. आज ही वेळ शेतकऱ्यावर आली आहे उद्या व्यापाऱ्या वर्गावर सुद्धा येऊ शकते त्यासाठी आपल्याला एकजुटीने शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहणे निकडीची आहे तरी सर्व व्यापारी वर्गाने उद्या बंद मध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आव्हान जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.