vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

राज्य प्रतिनिधी: खा. डॉ. कल्याण काळे यांनी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त कौशल सिंग यांच्यासोबत बैठक घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.या बैठकीत निवृत्तीवेतन, भविष्य निधी आणि इतर थकबाकीच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. जालना सहकारी साखर कारखाना मर्या. रामनगर येथील अनेक कामगारांना भविष्यातील सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची विलंबामुळे अडचण निर्माण झाली आहे.

कामगारांच्या मागणीनुसार—

1. UAN नंबर न मिळणे: 2014 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेत अनेक कामगारांना अद्याप UAN क्रमांक मिळालेला नाही, यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

2. थकबाकी रक्कम खात्यात जमा करणे: साखर कारखान्याने 2010 मध्ये भरलेली ₹5,83,22,342/- ची रक्कम अजूनही कामगारांच्या खात्यात जमा झालेली नाही, ती त्वरित वर्ग करावी.

3. पेन्शन वाढीव मिळण्यासाठी कार्यवाही: न्यायालयाच्या निर्णयानुसार वाढीव पेन्शन मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी.

4. PF थकबाकी भरपाई: कारखान्याने कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केलेली PF रक्कम दंड व व्याजासह भरावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती पुरवावी.

खा. डॉ. काळे यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जालना आणि परिसरातील शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.या बैठकीस जालना साखर कारखान्याचे श्री रामेश्वर डोंगरे, संतोष देशमुख, साहेबराव कांदे, दत्तू जुंबड, भिकाजी गवार, ज्ञानेश्वर औटे, एकनाथ पठाडे, अप्पासाहेब अवघड, अरुण वझरकर आदींची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांची अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहास सदिच्छा भेट..

vishwatmaklokswamivarta

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा

vishwatmaklokswamivarta

आयुष्यभर झिजलेल्या लेखणीचा ऐतिहासिकसन्मान..!बुलढाण्यात ’पत्रयोगी जीवनगौरव’ पुरस्कार ठरला भावस्पर्शी-केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta