vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा- जिल्हाधिकारी अशोक काकडेजिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. तारा भवाळकर यांचा केला सत्कार

 

        सांगली, प्रतिनिधी : आपली संस्कृती विविध भागांना जोडणारी आहे. संस्कृती ही सुई दोऱ्यासारखी असते, ती जोडणारी असते. आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा असते. शब्द हे नंतर त्याच्यातून आकार घेत असतात. आपली संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

 दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या भावस्पर्शी कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोखर, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मा. पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उज्ज्वला परांजपे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. तारा भवाळकर यांना उत्तम आरोग्याबरोबर दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.   यावेळी डॉ. तारा भवाळकर यांनी आपली भाषा, संस्कृती याबद्दल विविध उदाहरणे दिली. भाषा ‍टिकविण्यासाठी ती कृतीमध्ये आली पाहिजे असे सांगून त्या म्हणाल्या, भाषा टिकविण्यासाठी ती दैनंदिन ऐकणे, बोलणे महत्वाचे आहे. लोकसंस्कृतीतून समाजाचा इतिहास कळतो. सध्या पाहिले तर समाजाच्या तळागाळापर्यंत आपल्या मातृभाषेच्या बोलण्यामधील शब्दात इंग्रजीची भेसळ झालेली आहे. विविध भागातील संस्कृती वेगवेगळी असते. माणसांना एकमेकांशी बांधायचे झाले तर भाषेशिवाय दुसरे साधन नाही. आपल्या भाषेमध्ये व शैलीमध्ये बोलायला लागलो तर आपलेपणा निर्माण होतो. शब्दाने माणूस जोडला जातो. परंतु तो कुठे, किती व कसा वापरावयाचा हे कळले पाहिजे असे त्या म्हणाल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या सत्काराबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी खासदार विशाल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. तारा भवाळकर यांनी सांगलीचे नाव देश व परदेशात नेल्याचे सांगून त्यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन तहसिलदार लिना खरात यांनी केले.

 

00000

संबंधित पोस्ट

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले

मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· मुंबईत २४ केंद्रे, ९ प्रगतीपथावर· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ…

vishwatmaklokswamivarta

राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावावर डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करणार

कन्नड येथे पथदर्शी प्रकल्प; शहरी भागात ड्रोनद्वारे जमिन मोजणी‘नक्शा’साठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta