vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सोलापूरच्या समान पाणी वितरणासाठी आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूरच्या समान पाणी वितरणासाठी आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्य प्रतिनिधी

सोलापूर शहरासाठीचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन जलवितरण प्रणाली आणि वाढीव जलसाठवण क्षमता निर्मितीसाठीचा प्रकल्प टप्पा २ तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या कार्यवाहीस गती द्यावी. तसेच सोलापूरवासियांना समसमान पाणी वितरणासाठीचा आराखडा तयार करून ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना संदर्भात विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना तातडीने पाणी मिळावे, यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भात निर्देश दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरास होणारा अपुरा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि समसमान पाणी वितरण प्रणाली राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. नवीन उच्चस्तरीय जलकुंभ पहिल्या टप्प्यात व १३ नवीन उच्चस्तरीय जलकुंभ बांधणे तसेच नवीन जलवाहिन्या, मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन आणि वाढीव पंपिंग क्षमता उभारण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच पाकणी येथे ६६ द.ल.ली. क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याच्या प्रकल्प कामातील भू-संपादनाची प्रक्रिया जलदगतीने करावी जेणेकरून समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

.बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के.एच.गोविंदराज, नियोजन विभागाचे अपर मुख्य डॉ. राजगोपाल देवरा, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, नगरपरिषदेचे आयुक्त मनोज रानडे उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री यांची मंजुरी

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…

भारतीय महिला संघाने ICC विश्वचषक 2025 जिंकत रचला इतिहास. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

vishwatmaklokswamivarta

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचेही माध्यम – सभापती प्रा.राम शिंदे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची जल्लोषात सांगता