vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

“”गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 

मुंबई प्रतिनिधी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  रमजान महिन्याच्या निमित्ताने मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुल पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी, मा. अजितदादांनी राज्यातील सर्व मुस्लिम बंधू भगिनींना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

भारत हा विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊनच समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला आणि आपल्याच हाच वारसा पुढे न्यायचा आहे. लवकरच गुढीपाडवा येत आहे, नंतर रमजान ईद येईल. आपल्याला हे दोन्ही सण एकत्र आणि आनंदाने साजरे करायचे आहेत, असे मा. अजितदादा म्हणाले.

एकता, समता, त्याग, समर्पण, बंधू भाव वाढीस लावणारा हा रमजानचा पवित्र महिना आहे. रमजान हा फक्त एका धर्मापुरता सीमित नाही. तर हा महिना आपल्याला मानवता, एकता आणि बंधुभावाचा संदेश देतो. हा महिना फक्त शरीरच नव्हते तर मन आणि आत्मा देखील शुद्ध करतो, असे मा. अजितदादा यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले. तसेच, समाजातील शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, मग तो कोणीही असो, असा विश्वास देखील यावेळी मा. अजितदादांनी यावेळी दिला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते मा. आ. श्री. छगन भुजबळ, पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नवाब मलिक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, मा. आ. श्री. शेखर निकम, मा. आ. श्रीमती. सना मलिक, मा. आ. श्री. रईस शेख, मा. आ. श्री. विक्रम काळे, मा. आ. श्री. चेतन तुपे, मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मा. आ. श्री. इद्रिस नायकवाडी, मा. आ. श्री. मनोज कायंदे, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, मा. श्री. मुश्ताक अंतुले, अंजुमन इस्लामचे चेअरमन मा. श्री. जहीर काजी, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मा. श्री. सोहेल खडवाणी, मा. श्री. आसिफ भामला यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

36104 नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी घेतला सन 2024-25 वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ..           

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार-2025कोकण व मुंबई प्राधिकरण विभागांनी पटकाविले सर्वाधिक 33 पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण