vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

“”गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 

मुंबई प्रतिनिधी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  रमजान महिन्याच्या निमित्ताने मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुल पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी, मा. अजितदादांनी राज्यातील सर्व मुस्लिम बंधू भगिनींना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

भारत हा विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊनच समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला आणि आपल्याच हाच वारसा पुढे न्यायचा आहे. लवकरच गुढीपाडवा येत आहे, नंतर रमजान ईद येईल. आपल्याला हे दोन्ही सण एकत्र आणि आनंदाने साजरे करायचे आहेत, असे मा. अजितदादा म्हणाले.

एकता, समता, त्याग, समर्पण, बंधू भाव वाढीस लावणारा हा रमजानचा पवित्र महिना आहे. रमजान हा फक्त एका धर्मापुरता सीमित नाही. तर हा महिना आपल्याला मानवता, एकता आणि बंधुभावाचा संदेश देतो. हा महिना फक्त शरीरच नव्हते तर मन आणि आत्मा देखील शुद्ध करतो, असे मा. अजितदादा यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले. तसेच, समाजातील शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, मग तो कोणीही असो, असा विश्वास देखील यावेळी मा. अजितदादांनी यावेळी दिला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते मा. आ. श्री. छगन भुजबळ, पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नवाब मलिक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, मा. आ. श्री. शेखर निकम, मा. आ. श्रीमती. सना मलिक, मा. आ. श्री. रईस शेख, मा. आ. श्री. विक्रम काळे, मा. आ. श्री. चेतन तुपे, मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मा. आ. श्री. इद्रिस नायकवाडी, मा. आ. श्री. मनोज कायंदे, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, मा. श्री. मुश्ताक अंतुले, अंजुमन इस्लामचे चेअरमन मा. श्री. जहीर काजी, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मा. श्री. सोहेल खडवाणी, मा. श्री. आसिफ भामला यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर,फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

विलंबित पुनर्विकासात भाडे बंधनकारक करणारा कायदा आणण्यास शासन सकारात्मक- उद्योग मंत्री उदय सामंत

उर्स सोहळ्याचे पावित्र्य व भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी