vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई पवई येथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल…

मुंबई पवई येथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल…

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईच्या पवई येथील साकी विहार रोडवरील निवासी संकुलात एका सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षक भवानीप्रसाद झा  यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस  करत आहेत

याबाबतची माहिती अशी की

भाषेच्या मुद्द्यावरून हाणामारी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बँकांमध्ये मराठीचा सक्तीने वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर, मनसे कार्यकर्ते सातत्याने बँकांमध्ये जाऊन मराठीत व्यवहार करण्याची पाहणी करण्यास सांगितले होते. त्याचवेळी पवईतील एका सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.

३१ मार्च रोजी रात्री कामावर असताना, एका डिलिव्हरी बॉयशी त्यांची चर्चा झाली. अजिंक्य असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून, तो ऑर्डर डिलिव्हरीसाठी आला होता. भवानी प्रसाद झा यांनी त्याच्याशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे अजिंक्य नाराज झाला. ऑर्डर पूर्ण केल्यानंतर अजिंक्यने झा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले.

वाद वाढत गेल्याने वैतागून झा यांनी मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अजिंक्य संतप्त झाला आणि तो काही वेळाने विजय निकम, संजय मुले आणि महेश गिरम या तीन सहकाऱ्यांसोबत परतला. या चौघांनी मिळून झा यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून माफी मागायला लावली

या घटनेनंतर भवानीप्रसाद झा यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजिंक्य आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाले. पोलिसांनी ते चित्रीकरण मिळवले असून त्याद्वारे पवई पोलीस तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हा-लातूर जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू असून खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने सदर मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद विविध ठिकाणी पावसामुळे बंद असल्याने नागरिकांच्या माहितीकरिता

ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा* जिल्हाधिकारी संतोष पाटील*

भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे योगाभ्यास कार्यक्रम

मातीच्या पणत्यांतून उजळतेय भविष्याचे आकाश;बालगृहातील मुलांना मिळाला नवा आत्मविश्वास!- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे धडे – 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व समता पंधरवड्यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta