vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

   सांगली, प्रतिनिधी: भाविकांना, वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या काळात पथकरातून सूट देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे पास सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी, वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. पास मिळवण्यासाठी वैध वाहनाचे नोंदणी पुस्तक सोबत घेवून यावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याबाबत दिनांक 16 जून 2021 च्या शासन परिपत्रकात निर्देशित केलेले आहे. दि. 18 जून 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या-येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच पथकरातून सूट देण्यासाठी आषाढी एकादशी २०२५ करिता विहित केलेल्या नमुन्यात सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मराठी भाषा सक्ती : नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित

विभागीय क्रीडा संकुल समिती बैठक-प्रवेशासाठी डिजीटल पडताळणी पद्धतीचा अवलंब;ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र;    चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर

vishwatmaklokswamivarta