vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी अशोकराव आगलावे सर्वांच्या सहकार्‍याने फेस्टीवल दणदणीत साजरा करु-अशोकराव आगलावे

जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी अशोकराव आगलावे सर्वांच्या सहकार्‍याने फेस्टीवल दणदणीत साजरा करु-अशोकराव आगलावे

जालना प्रतिनिधी : जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता अशोकराव आगलावे यांची सर्वानुमते आज रविवारी निवड करण्यात आली. दरम्यान, जालना गणेश फेस्टीवल यंदाही सर्वांच्या सहकार्याने दणदणीत साजरा करु, अशी ग्वाही नुतन अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंते अशोकराव आगलावे यांनी येथे बोलतांना दिली.

जालना गणेश फेस्टीवलची डॉ. संजय लाखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात बोलावण्यात आलेल्या बैठकीत श्री. आगलावे हे बोलत होते. प्रारंभी श्री. आगलावे यांचा मावळते अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी सत्कार करुन पदभार त्यांच्याकडे सोपवला. यावेळी फेस्टीवलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, दिनेश फलके, माऊली कदम, अशोक उबाळे, शरद देशमुख, किरण गरड, माजी अध्यक्ष साईनाथ पवार, माजी कार्याध्यक्ष सुरेश मुळे तसेच प्रा. राजेंद्र भोसले, चंद्रशेखर वाळिंबे, रविंद्र हुसे, गणेश सुपारकर, सतीशराव देशमुख, अविनाश भंडे, अनिल व्यवहारे, मधुकर मुळे, संजय देशमुख, राहुल सुपारकर, प्रशांत जिगे, प्रसाद वाढेकर, अजिंक्य घोगरे, दशरथ शिंदे, उदय देशमुख, रोहित देशमुख, धनराज काबलिये, संताजी वाघमारे, आदींसह गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी आपले विचार मांडून साधक- बाधक चर्चेत सहभाग नोंदवला. तर शेवटी उपस्थितांचे आभार जगत घुगे यांनी मानले.

पुढे बोलतांना श्री. आगलावे म्हणाले की, आपणासर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडण्यात आपण यशस्वी होऊत, यात शंका नाही. अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार कार्यक्रमांची मेजवाणी यंदाही देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपणा सर्वांची साथ आणि गणपती बाप्पाचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत, असेही शेवटी श्री. आगलावे म्हणाले.(छाया : अनिल व्यवहारे)

संबंधित पोस्ट

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य

वीर जवान रामदास बढे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..

राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

उमेद’च्या माध्यमातून बँक आपल्या दारी- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta