vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार,स्वयम योजनेसाठी अर्ज करावेत

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार,स्वयम योजनेसाठी अर्ज करावेत

जालना, प्रतिनिधी:- इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेसाठी अर्ज दि. 17 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत मागविण्यात आले आहे. तरी या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षीची दि. 1 ऑगस्ट 2025 पासून वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 1 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी/एम.कॉम असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

पामबीच मार्गावरुन सायन पनवेल महामार्गावर जाण्याकरीता उपयोगी आर्म उड्डाणपूलाचे लोकार्पण

परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta