vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, वाचकांसाठी चांगल्या सेवा व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) यांना “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतात.या पुरस्कारांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये व 25 हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय, राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट प्रदान करण्यात येईल.

सन 2024-25 या वर्षासाठीचे अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. संचालक श्री. अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

vishwatmaklokswamivarta

सुपर एल निनो’: २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

राजस्थानमध्ये जोधपूर इथं झालेल्या रस्ते अपघातात १९ जणांचा मृत्यू तर तेलंगणमध्ये रंगारेड्डी इथल्या अपघातात १७ जण मृत्यूमुखी, पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख.

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन