vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू..

लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू..

राज्य प्रतिनिधी-मुंबईतील लालबाग परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर, ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. ही ह्रदयद्रावक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

अज्ञात व्यक्ती भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेनं आला. त्या व्यक्तीने झोपलेल्या मुलांना धडक दिली. या धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच मृत्यूमुखी पडली. तर जखमी मुलावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये सर्वत्र बाप्पाच्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. लालबाग राजाच्या परिसरात भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये दोन चिमुरड्यांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लालबाग राजाच्या मिरवणुकीला काही वेळ शिल्लक असतानाच ही घटना घडली आहे. आज गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या जल्लोषात भाविक आहेत. सकाळपासूनच एक लगभग रस्त्यावर बघायला मिळत आहे. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत आणि एक वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे. मात्र, बाप्पाला निरोप देत असतानाच आता एक धक्कादायक घटना घडली आहे. लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ही घटना लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशव्दाराच्या समोर घडली. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुलं फुटपाथवर झोपली होती. यामधील एका मुलाचा मृत्यू झाला आहे आणि एक जण गंभीर जखमी आहे. पुढील तपास सुरू आहे

संबंधित पोस्ट

मुंबई ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा…

दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !‘सनातन प्रभात’चे कार्य राष्ट्र उभारणीसाठी !– श्री. रवींद्र प्रभुदेसाई

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा