vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

मुंबई, प्रतिनिधी : खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. खरवंडी येथील ही 4 हेक्टर जागा भक्तगणांच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.

“केंद्र सरकारकडे या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता त्याला यश आले आहे. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती भाविकांना देताना अतिशय आनंद होतो आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार व्यक्त करताना म्हटले आहे.

०००

 

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टीचे महा सदस्य नोंदणी अभियान सुरू

vishwatmaklokswamivarta

व्यसन दुष्परिणामाबाबत प्रत्येक शाळेत20 फेब्रुवारी, 11 मार्चला परिपाठ – जिल्हाधिकारी अशोक काकडे- व्यसन दुष्परिणाम परिपाठामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- व्यसनमुक्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन- तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी दक्ष राहा…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

मुंबई महापलिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या चार ही पक्षांनी एकत्र लढाव्यात- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्दीनी नदीचे पूजन करून 211 मीटरची अखंड साडी अर्पण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta