vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यातील सर्व उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठीच्या पदभरतीची लेखी परीक्षा दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. जालना शहर परिसरातील एकुण 24 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. तरी परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.

 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेच्या 24 उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनी क्षेपके बंद ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाच्या अंमलबजासाठी नोटीस देण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नूसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. आदेश दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पालघरमध्ये भीषण दुर्घटना प्रक्रिया मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा दिला आहे, तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असाही इशारा आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन;  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

vishwatmaklokswamivarta

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायन-पनवेल महामार्गावरीलठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न..

जिल्हाधिकारी मुलचेरात शेतीच्या बांधावर : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व निवासी पट्टे वितरण

vishwatmaklokswamivarta

धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अभिवादन केलं.

vishwatmaklokswamivarta