vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

[ मुंबई प्रतिनिधी] धारावी येथे

भारतीय संविधानाला यावर्षी २०२५ ला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्याचे औचित्य साधून *२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस* राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना एकत्र करून धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील संविधान चौक येथील स्तंभ व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अर्पण प्रतिमेला पुष्पहार घालून समाजाप्रती आदरांजली व संविधानाचे महत्त्व याविषयी चर्मकार नेते बाबुराव माने यांनी उपस्थित जनसमुदायाला सविधान महत्व पटवून दिले त्यानंतर श्री. अनिल कासारे यांनी संविधानाची उद्देशिकेचे वाचन केले अत्यंत कमी वेळात समाज बांधवांना एकत्र आणून संविधान दिनाच्या औचित्य व २६ नोव्हेंबर मध्ये लढता लढता वीर झालेल्या शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी मांडली व प्रत्यक्षात अमलात आणली गेली हे विशेष मुंबई अध्यक्ष श्री. विलास गोरेगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री. गिरीराज शेरखाने यांनी स्वतःहून उद्देशिकेचे प्रती व शहिदाचे छायाचित्र प्रति मोफत वाटप केल्या या कामी श्री. शंकर बळी, सुनील पवार,विजय खरात, किरणताई पोटे, दिलीप दडस, बाबा कदम, पंडित कदम यांनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर मध्ये वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

संबंधित पोस्ट

वंदे भारत प्रवास अधिक सोपा – १५ मिनिटे आधी मिळणार कन्फर्म सुविधा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

vishwatmaklokswamivarta

22 एप्रिल रोजी घनसावंगी तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत..

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

इराण-इराक मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे    – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी**अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta