vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नांदेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत – १०० दिवसांचे अभियान अंतर्गत आज शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील सर्व शासकीय कार्यालये तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.

बालविवाह समूळ उच्चाटन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, बालविवाहामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंध ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शपथविधी कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कैलास तिडके तसेच सर्व शाखांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.तसेच याच अनुषंगाने नांदेड शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्येही बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.

०००००

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात मोबाईल मेडिकल युनिटचे उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते सत्कार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन ; सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

जालना शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा नागेवाडी जालना या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव..