vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली-विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या लावणी परंपरेला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्यावतीने “सोळावं वरीस धोक्याचं – अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टी आणि लोकसंगीताच्या क्षेत्रात सुलोचना चव्हाण यांनी आपल्या दमदार आवाजातून लावणीला वेगळे स्थान मिळवून दिले. “सोळावं वरीस धोक्याचं”सारख्या अजरामर लावण्यांमुळे त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीतून लावणीच्या परंपरेला नवी ओळख मिळाली आणि मराठी सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित हा स्वरोत्सव मराठी लोकसंगीताच्या परंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका संपदा माने आणि संज्योती जगदाळे या सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली अर्पण करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन निवेदक परेश दाभोळकर करणार असून संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या स्वरोत्सवासाठी विनामूल्य प्रवेशिका ११ मार्चपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहावर उपलब्ध आहेत. मुंबई व परिसरातील नागरिक, संगीतप्रेमी आणि लावणी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अजरामर लावण्यांच्या स्वरोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित..

मुंबई डीआरआयने कोकेन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला, मुंबई विमानतळावर 17.18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; एकाला अटक

vishwatmaklokswamivarta

डिजिटल व्यवहारांसाठी डाक विभागाची विशेष मोहीम:· प्रीमियम, पॉलिसी, दाव्यांची माहिती तत्काळ मिळणार· ग्राहकांनी केवायसी दस्तऐवजांसह माहिती सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे