vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहेसन 2003 पासून सातत्याने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत जागतिक स्तरावरील (QS World University Ranking) पहिल्या 200 क्रमांकातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते

योजनेत 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असून त्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास खर्च, शिक्षण फी, निर्वाह भत्ता तसेच आकस्मिक खर्चाचा लाभ मिळणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे तर पीएच.डी.साठी 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर नमूद असलेले MD व MS अभ्यासक्रमच पात्र मानले जातील

इच्छुक विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो पूर्ण भरून सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट द्यावे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

वारी मार्गावरील विविध ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*

सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या-अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मा. न्यायालयाच्या आदेशाचे सरकारने कठोर अंमलबजावणी केल्यास दलित आदीवासी भूमिहीन कास्तकराचे कास्तपट्टे नियमानूकुलित होतील – अ‍ॅड. भास्कर मगरे

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे-ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार..