vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्न-प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा -मंत्री अतुल सावे

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्न-प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा -मंत्री अतुल सावे

राज्य प्रतिनिधी-राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर सयंत्र प्राधान्याने पूर्ण करावे तसेच प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तर दायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) नियामक मंडळाची १०८ वी तसेच ३१ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पुणे येथील महाऊर्जा भवन येते पार पडली. यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महाऊर्जा महासंचालक ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर व सर्व विभागांचे महाव्यवस्थापक, उपसंचालक लेखा व इतर अधिकारी उपस्थित होते.

श्री. सावे यांनी पीएम कुसुम योजनेमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉल सेंटर सुरू करावे. सध्याच्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी विभागाच्या सर्व इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची सूचना दिल्या.

यावेळी महाऊर्जा कार्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या प्रकल्प अधिकारी व लेखापाल यांना मंत्री श्री. सावे व श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील साकीनाका येथे रस्त्यावरील उघड्या मेन हॉलमध्ये पडून एका स्थानिकाचा मृत्यू झाले असल्याची वृत्त

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

रुग्णवाहिका चालक-मालकांनी रुग्णवाहिकेचे दरपत्रक,रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात प्रत्यक्ष कृतीतून पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta