vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

 

मुंबई प्रतिनिधी – कल्याण मधील चक्कीनाका येथील 12 वर्षांच्या अल्पवयीन निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यातील दोषी आरोपींना कठोरता कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.आज कल्याण मधील चक्की नाका येथील बळीत मुलीच्या कुटुंबियांची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर आर्थिक मदत लवकरच करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.पीडित मुलीच्या कुटुंबाला राज्य सरकार तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.यावेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, पद्मश्री कल्पना सरोज , सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घिटे, आदी अनेक उपस्थित होते.

कल्याण मधील अवघ्या 12 वर्षांच्या निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करणारा नराधम गुन्हेगार असून परिसरात त्यांनी अनेक वाईट कृत्ये केली आहेत. चक्कीनाका या परिसरात धोकदायक इमारत असून या इमारतीचा वापर गुन्हेगार आरोपीने दुष्कृत्य करण्यासाठी केला आहे.मनपाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारती मधील अनेकांनी घरे रिकामी केली असल्याने ही इमारत निर्जन झाली असून त्याचा वापर गुन्हेगार करीत होता.याच इमारतीत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या केली.त्यामुळे ही इमारत कल्याण डोंबिवली मनपा ने त्वरित तोडून टाकावी अशी मागणी बळी गेलेल्या मुलीच्या परिवाराने आणि स्थानिक रहिवासीयांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे करताच ना.आठवलेंनी के डी एम सी च्या आयुक्त इंद्रायणी जाखड यांना दृध्वनी करून संबंधित धोकादायक इमारत तपासून निष्कासित करण्याचे निर्देश दिले.

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या अत्याचाराच्या अमानुष घटना घडत असून समाजात माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटना रोखल्या पाहिजेत त्यासाठी सरकार पोलीस आणि जागृत सामाजिक कार्यकर्त्यांनी ही पुढे आले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- खा. श्रीरंग बारणे दिशा’ समितीची बैठक संपन्न

सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबविणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-अतिक्रमित वीटभट्ट्यांवरही कारवाई होणार

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार