vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

 

मुंबई प्रतिनिधी – कल्याण मधील चक्कीनाका येथील 12 वर्षांच्या अल्पवयीन निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यातील दोषी आरोपींना कठोरता कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.आज कल्याण मधील चक्की नाका येथील बळीत मुलीच्या कुटुंबियांची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर आर्थिक मदत लवकरच करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.पीडित मुलीच्या कुटुंबाला राज्य सरकार तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.यावेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, पद्मश्री कल्पना सरोज , सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घिटे, आदी अनेक उपस्थित होते.

कल्याण मधील अवघ्या 12 वर्षांच्या निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करणारा नराधम गुन्हेगार असून परिसरात त्यांनी अनेक वाईट कृत्ये केली आहेत. चक्कीनाका या परिसरात धोकदायक इमारत असून या इमारतीचा वापर गुन्हेगार आरोपीने दुष्कृत्य करण्यासाठी केला आहे.मनपाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारती मधील अनेकांनी घरे रिकामी केली असल्याने ही इमारत निर्जन झाली असून त्याचा वापर गुन्हेगार करीत होता.याच इमारतीत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या केली.त्यामुळे ही इमारत कल्याण डोंबिवली मनपा ने त्वरित तोडून टाकावी अशी मागणी बळी गेलेल्या मुलीच्या परिवाराने आणि स्थानिक रहिवासीयांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे करताच ना.आठवलेंनी के डी एम सी च्या आयुक्त इंद्रायणी जाखड यांना दृध्वनी करून संबंधित धोकादायक इमारत तपासून निष्कासित करण्याचे निर्देश दिले.

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या अत्याचाराच्या अमानुष घटना घडत असून समाजात माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटना रोखल्या पाहिजेत त्यासाठी सरकार पोलीस आणि जागृत सामाजिक कार्यकर्त्यांनी ही पुढे आले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

संबंधित पोस्ट

विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली छायापत्रकारितेच्या क्षेत्रातील मनस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो

सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

vishwatmaklokswamivarta

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड . निलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट…

ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक,मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती