vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

            नवी मुंबई, प्रतिनिधी:- अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभागाच्या कार्यक्षेत्रातील 21 रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावरुन 3 मार्च, 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरावेत. असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई यांनी कळविले आहे.

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीनुसार अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभागाच्या कार्यक्षेत्रातील 21 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिशः (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. विहित पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. तसेच अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार अर्जदाराला शुल्क भरावे लागेल.

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे दूरध्वनी/भ्रमणध्वनी कॉल करत नाही. उमेदवारांशी पत्रव्यवहार करावा लागला तर संबंधित प्राधिकरणाद्वारेच केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती,नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नये. कोणत्याही अनैतिक दूरध्वनी/भ्रमणध्वनी कॉल्सपासून सावध राहावे. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संकेत स्थळावरुन भरावेत. अधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in या संकेस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन नवी मुंबई डाकघर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे केले आहे.

0000000000000

संबंधित पोस्ट

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

जिल्ह्याचा जीडीपी २०२७-२८ पर्यंत तीन लाख कोटींवर नेण्याचा संकल्प – जिल्हाधिकारी किशन जावळे