vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

‘100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

 

ठाणे प्रतिनिधी -जिल्हा परिषद, ठाणे) – मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ‘100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ व ‘महा आवास अभियान सन 2024-25’ अंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना पहिला हप्ता वितरीत करणे, सर्व घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे हे उपक्रम समाविष्ट आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्हयात सर्वत्र एकाच दिवशी 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज गुरुवारी, दि. 27 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सर्व ग्रामपंचायती मध्ये आयोजित करण्यात आलेला होता.

  ठाणे जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकूल योजनेंतर्गत एकूण 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांचा घरकूल भूमीपूजन कार्यक्रम दि. 27 मार्च,2025 रोजी ग्रामपंचायत स्तरावर संपन्न झाला असून भिवंडी तालुक्यातील राहूर ग्रामपंचायतीमधील कुंभारपाडा येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते घरकूल भूमीपूजन करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शहापूर व मुरबाड येथील ग्रामपंचायतींच्या घरकूल भूमीपूजनास भेट दिली.

   कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीमध्ये घरकुल भूमीपूजन कार्यक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांचे उपस्थितीत पार पडला.  त्याअनुषंगाने जिल्हयात सर्वत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण गृह निर्माण अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या सहभागाने घरकूल भूमीपूजन कार्यक्रम राबविण्याबाबत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले व घरकूल भूमीपूजन कार्यक्रमांमध्ये लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ, लाभार्थी यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घरकूल भूमीपूजन कार्यक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते.  ठाणे जिल्हयातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ व लाभार्थी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा पार पडला. जिल्हयात सर्वत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आहे.

000

संबंधित पोस्ट

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी; कृषी विभागाचे आवाह

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान : महसूल समाधान शिबिर’शिबिराद्वारे 58 हजार 990 नागरिकांना दिलासाविविध दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण, योजनांचा लाभ..

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…