vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आपत्ती ही काही सांगून येत नाही. मात्र सततचा अभ्यास, प्रशिक्षणाद्वारे सदैव सज्ज राहिल्यास आपण संभाव्य आपत्तीचा सामना करून जीवित व वित्त हानी टाळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज सरस्वती भुवन विद्यामंदिरात प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे लेफ्ट. आर. जी. यादव, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. दिनेश वकील, डॉ. रश्मी बोरीकर, मुख्याध्यापक निकुंभ, डॉ. सविता मुळे,श्रीमती आश्विनी भोसले आदी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपत्तीचे अनुमान करता येत नाही. मात्र आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू शकतो. या परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आपण हिच सज्ज असण्याची तयारी करत आहोत. आपल्या घरातील लहान लहान प्रसंगात ही सज्जता आपल्याला उपयोगी पडते. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हे प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापन सज्ज नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट आहे. हेच विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे विविध सत्र जिल्ह्यात आयोजित केले आहेत. आपत्ती व्यवस्थापनातून सज्जतेचे धडे घेऊन येणाऱ्या आपत्तीना आपण सामोरे जाण्यासाठी सज्ज होऊ.

 प्रास्ताविक आश्विनी भोसले यांनी तर अध्यक्षीय समारोप ऍड. वकील यांनी केला. मंगेश डोलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

विविध उपक्रमांव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महाआरोग्य शिबीर उपक्रमाबद्दल धर्मादाय अधिकाऱ्यांचे केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार 

पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे