ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार
ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार
राज्य प्रतिनिधी-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या करारामुळे ऊर्जा क्षेत्र, गुंतवणूक आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार असून संपूर्ण ईशान्य भारताच्या प्रगतीला चालना मिळणार आहे. नागालँडमधील तेल, वायू आणि खनिज संपत्ती भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासोबतच आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल.
ईशान्येतील जवळपास ८०% क्षेत्र AFSPA मुक्त झाले असून संपूर्ण प्रदेश AFSPA मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘राष्ट्र प्रथम’च्या भावनेतून ईशान्य भारताचा सर्वांगीण विकास हा सरकारच्या प्राधान्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.
केंद्र, आसाम आणि नागालँड यांच्यातील हा करार सहकारी संघराज्यवाद आणि सामायिक विकासाच्या भावनेचे उत्तम उदाहरण आहे