आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश
नवी दिल्ली प्रतिनिधी -आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, सरकार प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. संबंधित यंत्रणा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’, ‘गल्फ ऑफ ओमान’ आणि लगतच्या सागरी क्षेत्रांमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
भारतीय खलाशांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी सरकार परराष्ट्र मंत्रालय, भारतीय नौदल, परदेशातील भारतीय दूतावास आणि इतर संबंधित घटकांशी समन्वय साधत आहे.
ओमानच्या किनारपट्टीजवळ ‘एमटी सेटेबेलो’ (MT Settebello) या जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर जहाजावरील उर्वरित कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. सरकारने बाधित कुटुंबांना सर्व आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले असून, त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत