vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आता QR कोडद्वारे तक्रार-सुचना नोंदवा;प्रशासनाचे डिजीटल पाऊल

आता QR कोडद्वारे तक्रार-सुचना नोंदवा;प्रशासनाचे डिजीटल पाऊल

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आपल्यावर होणारा अन्याय, कामकाजातील दिरंगाई यासाठी नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यां QR नी कोड ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. फक्त QR कोड आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करा आणि आपली तक्रार वा सुचना नोंदवा, अशी ही अभिनव संकल्पना असून आजपासून प्रत्येक तहसिल व उपविभागीय कार्यालयांमध्ये हे QR कोड प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच आजपासून जेथे मंडळस्तरावर कार्यालये कार्यरत नव्हती तेथे मंडळ कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत.

नागरिकांना तक्रार व सूचना नोंदविताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयांमध्ये तक्रार पेटीशेजारी QR कोड लावण्यात आले आहेत. या QR कोडच्या माध्यमातून नागरिक आता आपली तक्रार किंवा सूचना डिजिटल पद्धतीने थेट नोंदवू शकतील. जिल्ह्यात सध्या १६ ठिकाणी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत.

या उपक्रमामुळे नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार अर्ज देण्याचा त्रास टळेल. प्रवास खर्च वाचेल, तसेच, ज्यांना डिजिटल प्रणालीचा वापर शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच तक्रार किंवा सूचना लिहून पेटीत टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा उपक्रम पारदर्शक, तत्पर आणि उत्तरदायी प्रशासनाकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

QR कोड स्कॅन केल्यावर नागरिकांनी आपली प्राथमिक माहिती (नाव, फोन नंबर इ.) भरुन आपली तक्रार वा सुचना टाईप करुन नोंदवावी. ही तक्रार अपलोड केल्यावर ती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात प्राप्त होईल. ती तक्रार तात्काळ संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल व तक्रारी, सुचनांच्या अंमलबजावणीबाबत पाठपुरावा व आढावा घेण्यात येईल.

नागरिक कोणत्याही भीतीशिवाय आपले मत नोंदवू शकतात अशा प्रकारे, हा उपक्रम म्हणजे शासकीय कार्यपद्धतीत नव कल्पना आणून उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन उभे करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी 30 नोव्हेंबर अखेर जाहिरनामा सादर करावा -नितिन उबाळे

vishwatmaklokswamivarta

भारतीय नौदल तिरुवनंतपुरम येथे भव्य परिचालन प्रात्यक्षिकासह नौदल दिन 2025 साजरा करणार

vishwatmaklokswamivarta

प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचाअनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

तारळी प्रकल्पातील उपसा जलसिंचन योजना10 ऑगस्ट पूर्वी कार्यान्वित करावी- मंत्री शंभुराज देसाई

देशात २४ तासात १ लाख ८० हजार रुग्ण; ओमिक्रॉनचे रुग्ण 4 हजार… रुग्ण वाढण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta