vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

जालना,  (प्रतिनिधी) – जालना शहरातील उद्योग नगरी परिसरातील श्री सत्यजित राय, उत्तर भारतीय संघाचे शितला प्रसाद पांडे व उत्तर भारतीय नागरिकांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन जालना ते पटना रेल्वे मार्गाची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जालना व परिसरातील सुमारे पंचवीस हजार उत्तर भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी या गाडीची मागणी केली.

या प्रयत्नाला यश आले असून रेल्वे प्रशासनाने नांदेड-रायचूर व पूर्णा- पटना या दोन्ही गाड्यांचा विस्तार आता जालना पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-रायचूर ही गाडी तात्पुरत्या स्वरूपात जालना वरून सुरू होणार असून प्रथमतः नांदेडला जाईल आणि त्यानंतर रायचूरपर्यंत धावेल.

तसेच पूर्णा-पटना ही गाडी देखील जालना पासूनच उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे जालना, परभणी, पूर्णा व नांदेड या भागातील प्रवाशांना रायचूर व पटना भागात जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ व खर्च वाचणार आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिकांकडून होत असून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta