vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

[ मुंबई प्रतिनिधी] धारावी येथे

भारतीय संविधानाला यावर्षी २०२५ ला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्याचे औचित्य साधून *२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस* राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना एकत्र करून धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील संविधान चौक येथील स्तंभ व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अर्पण प्रतिमेला पुष्पहार घालून समाजाप्रती आदरांजली व संविधानाचे महत्त्व याविषयी चर्मकार नेते बाबुराव माने यांनी उपस्थित जनसमुदायाला सविधान महत्व पटवून दिले त्यानंतर श्री. अनिल कासारे यांनी संविधानाची उद्देशिकेचे वाचन केले अत्यंत कमी वेळात समाज बांधवांना एकत्र आणून संविधान दिनाच्या औचित्य व २६ नोव्हेंबर मध्ये लढता लढता वीर झालेल्या शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी मांडली व प्रत्यक्षात अमलात आणली गेली हे विशेष मुंबई अध्यक्ष श्री. विलास गोरेगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री. गिरीराज शेरखाने यांनी स्वतःहून उद्देशिकेचे प्रती व शहिदाचे छायाचित्र प्रति मोफत वाटप केल्या या कामी श्री. शंकर बळी, सुनील पवार,विजय खरात, किरणताई पोटे, दिलीप दडस, बाबा कदम, पंडित कदम यांनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर मध्ये वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

संबंधित पोस्ट

बोधचिन्ह’ स्पर्धेत २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेंद्र राख यांची निवड*

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी -मंत्री मंगलप्रभात लोढा§ जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार§ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार.

आज 16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी…

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ