vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

[ मुंबई प्रतिनिधी] धारावी येथे

भारतीय संविधानाला यावर्षी २०२५ ला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्याचे औचित्य साधून *२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस* राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना एकत्र करून धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील संविधान चौक येथील स्तंभ व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अर्पण प्रतिमेला पुष्पहार घालून समाजाप्रती आदरांजली व संविधानाचे महत्त्व याविषयी चर्मकार नेते बाबुराव माने यांनी उपस्थित जनसमुदायाला सविधान महत्व पटवून दिले त्यानंतर श्री. अनिल कासारे यांनी संविधानाची उद्देशिकेचे वाचन केले अत्यंत कमी वेळात समाज बांधवांना एकत्र आणून संविधान दिनाच्या औचित्य व २६ नोव्हेंबर मध्ये लढता लढता वीर झालेल्या शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी मांडली व प्रत्यक्षात अमलात आणली गेली हे विशेष मुंबई अध्यक्ष श्री. विलास गोरेगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री. गिरीराज शेरखाने यांनी स्वतःहून उद्देशिकेचे प्रती व शहिदाचे छायाचित्र प्रति मोफत वाटप केल्या या कामी श्री. शंकर बळी, सुनील पवार,विजय खरात, किरणताई पोटे, दिलीप दडस, बाबा कदम, पंडित कदम यांनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर मध्ये वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

संबंधित पोस्ट

मतदारांची माहिती संकलित करण्यासाठी घरी येणा-या बीएलओ यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सामाजिक समता कार्यक्रम संपन्न

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत सात पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरु