vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषद

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषद

 

     अमरावती, प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या युगात मैलाचा दगड ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘ICAIISD-2025’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष आणि समाजविकासाचा जागतिक संवाद विदर्भाच्या मातीत घडणार आहे

     शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार असून, यासाठी देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ आणि उद्योजकांची मांदियाळी जमणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सचिन मांडवगणे तर प्रमुख अतिथी म्हणून बंगळुरू येथील ‘आयआयएसी’चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी मार्गदर्शन करतील. याशिवाय, न्यूरोसिनॅप्टिकचे समीर सावरकर, सी-कॅम्पचे डॉ. निरंजन जोशी आणि डॉ. रविंद्र केसकर यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती परिषदेला लाभणार आहे.

या परिषदेत प्रामुख्याने शेती, आरोग्य, शिक्षण, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा आणि ग्रामीण विकास यांसारख्या १३ महत्त्वाच्या विषयांवर १३ संशोधन प्रबंध सादर केले जातील. या परिषदेचे शोधप्रबंध ‘स्प्रिंगर नेचर’ सारख्या जागतिक स्तरावरील नामांकित प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध केले जाणार आहेत.

   विदर्भातील विद्यार्थी आणि संशोधकांना जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधता यावा आणि स्थानिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरे शोधता यावीत, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. टाटा मोटर्स आणि टीसीएस सारख्या उद्योगांचे सहकार्य लाभलेली ही परिषद तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

00000

संबंधित पोस्ट

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

*पीककर्ज वितरणात सातारा जिल्हा राज्यात तिसरा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील* खरिप हंगामासाठी शंभर टक्के पीक कर्ज वितरण करा

विलंबित पुनर्विकासात भाडे बंधनकारक करणारा कायदा आणण्यास शासन सकारात्मक- उद्योग मंत्री उदय सामंत

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta