vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

      जालना, प्रतिनिधी उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात शनिवार, दि.14 मार्च 2026 रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये एकूण 713 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, तब्बल 14 कोटी 33 लाख 77 हजार 450 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.    लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-03 के.व्ही. मोरे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-01 जी.आर. ढेपे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितेश बंडगर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष परमेश्वर गडगीळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे व इतर न्यायालयीन अधिकारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये एकूण 31856 प्रकरणे लोकअदालतीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भूसंपादन, एन.आय. ॲक्ट कलम 138 आणि दावा दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. या लोकअदालतीचे विशेष यश म्हणजे कौटुंबिक वादातील दोन प्रकरणे सामोपचाराने सुटली. परिणामी, दोन विभक्त राहणाऱ्या महिला पुन्हा आपल्या पतीच्या घरी नांदायला गेल्या असून दोन विखुरलेले संसार पुन्हा सुखाने बहरले आहेत. प्रलंबित प्रकरणे 6300 प्रकरणांपैकी 510 प्रकरणे निकाली निघाली. अशा प्रकारे एकूण 713 प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या मिटवण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणी 25,556 प्रकरणांपैकी 203 प्रकरणे निकाली निघाली. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, बँक अधिकारी, पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उल्हासनदीची केली पाहणी-‘वीड टू वेल्थ’ या प्रकल्पामार्फत जलपर्णी पासून तयार करणार शोभेच्या वस्तू..

जावळी तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय एफपीओ बैठक 2025 चे

vishwatmaklokswamivarta

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली काय म्हणाले राज ठाकरे? भाषा संपली तर… रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन