vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन

 

राज्य प्रतिनिधी- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” (CRT) बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने माहे एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक गावातील किमान ३०-४० शेतकऱ्यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

पाणी फाउंडेशनद्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाणार आहे.सदर शेती शाळा चार भागात घेतली जाणार असून त्याबद्दलचा तपशील नियोजित दिनांकासह खालील प्रमाणे आहे. भाग १- पेरणीपूर्व तंत्रज्ञान: बेड तयार करणे, बेडवर टोकन करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया- दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी नियोजित.भाग २- जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन: बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन. नियोजित दिनांक ८ एप्रिल २०२६.भाग ३- एकात्मिक कीड व्यवस्थापन: सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक,

लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर. नियोजित दिनांक १५ एप्रिल २०२६.भाग ४- भात शेतीचे लागवड तंत्र : भाताची थेट पेरणी, श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत. नियोजित दिनांक २२ एप्रिल २०२६.  या शेतीशाळेस कृषि विभागा अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी ४०-५० शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.उपरोक्त शेती शाळा नियोजित दिनांका दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळेची लिंक गाव निहाय शेतकरी यांचे व्हॉअसअपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे कृषी अधिक्षक कृषी कार्यालयाने कळविले आहे. 00000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंदार कुलकर्णी ‘शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठकाजिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही  – मंत्री मंगलप्रभात लोढा* रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल…

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याकामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घ्यावा- पालघर पालकमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta