vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात आजपासून दि. १५ मे ते ३० जून २०२६ या कालावधीत ‘नशामुक्त भारत अभियान’ विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, नर्सिंग स्कूल, आयटीआय आणि कोचिंग क्लासेसमध्ये जनजागृती केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने जनजागृती रॅली , चर्चासत्रे,सामूहिक नशामुक्ती प्रतिज्ञा ,निबंध व चित्रकला स्पर्धा,कलापथक आणि पथनाट्ये,विशेष व्याख्याने या द्वारे जाणीव जागृती करण्यात करण्यात येणार आहे.

मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत आणि समितीचे सदस्य विलास चंदने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका …

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजसेवकांचा सन्मान

राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त कर्मचाऱ्यांना दिलासा अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित- सचिव तुकाराम मुंढे

vishwatmaklokswamivarta