vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात.

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला आला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात

 

राज्य प्रतिनिधी- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप  त्याला अटक का केली जात नाही? त्यातच स्वतः वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. या वेळेला त्याचा ताबा बीड पोलिसांनी घेतला आहे

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात आहे. त्याला अटक का केली जात नसल्याचा आरोप केला जात असताना अचानकपणे उज्जैन वरून येऊन स्वतः वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे,

बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकी कराडने एक व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला आहे. या हत्येप्रकरणात ज्यांचा संबंध असेल त्यांना फाशीची द्यावी, माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही. खंडणी प्रकरणी मी पोलिसांना शरण जात आहे. शिवाय न्याय देवता देईल ती शिक्षा मला मान्य असेल, असं त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरूवातीपासून वाल्मिक कराड हे नाव मुख्य आरोपी आहे. कराडवर खंडणीचे अनेक आरोप असून देशमुख यांचे मारेकरी कराड याच्याशी संबंधित असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

अखेर 22 दिवसांनंतर कराड स्वत: पोलिसांना  शरण आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला वेग आल्याचा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आरोपी स्वत: शरण आला तर पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली? असा सवाल आता देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे. पुणे पोलिसांकडून आरोपी वाल्मीक कराड याला बीड पोलिसांना ताबा देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पुढील तपास सीआयडी आणि बीड पोलीस आणि स्पेशल विभाग करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 28.15 टी.एम.सी. पाणीसाठा

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा,छत्रपतीसंभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर करु- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण…

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! ‘स्वयंघोषित विचारवंतांचे उदात्तीकरण का?’ – विशेष परिसंवाद !पुरोगाम्यांच्या हत्यांचे भांडवल करून सनातन संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta