vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा क्रांती मोर्चा निमित्त 10 जानेवारी रोजी वाहतूक मार्गात बदल…

मराठा क्रांती मोर्चा निमित्त 10 जानेवारी रोजी वाहतूक मार्गात बदल…

  राज्य प्रतिनिधी-जालना, : मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटना वतीने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी 11.00 वाजता संभाजी महाराज पुतळा मोतीबाग जालना ते जिल्हाधिकारी कार्यालय जालना व अंबड चौफुली येथील हॉटेल शिवनेरी पर्यंत न्याय महाजन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, सदर ठिकाणी पोहचल्यानंतर मोर्चेचे रुपांतर सभेमध्ये होणार आहे. सदर मोर्चा व सभेच्या वेळी मोर्चास अडथळा निर्माण होवू नये. रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, या दृष्टीने वाहतुकीचे नियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल खालील प्रमाणे जालना शहरातील वाहतुक नमुद पर्यायी मार्गान कळविण्याचे आदेश पारीत केले आहेत.

     शुक्रवार, दि. 10 जानेवारी 2025 रोजी सध्याचा प्रचलित मार्ग – NH-753 अंबड चौफुली जालना- मोतीबाग – छत्रपती संभाजीनगर जालना पर्यायी मार्ग- बीड, अंबड, मंठा कडुन येणारी वाहतुक व छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतुक ही मंठा चौफुली- नाव्हा चौफुली देऊळगांव राजा चौफुली- कन्हैयानगर चौफुली भोकरदन चौफुली ग्रेडर टि पॉइंट मार्गे छ. संभाजीनगरकडे जाईल व येईल.

वरील आदेश दिनांक 10 जानेवारी,2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपासुन मराठा क्रांती मोर्चा व सभा संपेपर्यत अंमलात राहील.असे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहे.

     -*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर;-नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

महाराष्ट्रातील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ; राज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

रायगड जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन   — जिल्हाधिकारी किशन जावळे क्षयरोग मुक्त 376 ग्रामपंचायतींचा सत्कार

सर्वात भीषण दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये हिंदू नाव घेऊन पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर