vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

सातारा प्रतिनिधी: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराला विभाग प्रमुखांनीच उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारा संदर्भात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. या दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जनता दरबारात येणाऱ्या तक्रारी, निवेदने यांची नोंद करुन संकलन करावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून आपले प्रश्न मांडणार आहेत. मांडण्यात येणारा प्रत्येक प्रश्न विभाग प्रमुखांनी एकून घ्यावा व त्यावर कार्यवाही करावी.

लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. विभाग प्रमुखांनी आपल्या सोबत एक संगणक व प्रिंटरची व्यवस्था करावी. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनता दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारी व निवेदनावर कायद्यानुसार व नियमानुसार योग्य तो निर्णय तात्काळ घेऊन तो संबंधिताला कळवावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

0000

संबंधित पोस्ट

सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरणसौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारणा धरणात 22.07 टी.एम.सी. पाणीसाठा

विमानतळ परिसराचा १५ कि.मी.परीघ क्षेत्रात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस प्रशासनाचे आदेश

विश्वकोश मंडळातर्फे आज (दि.५) भूविज्ञान नोंदलेखन कार्यशाळा

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत