
जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..
जालना, (प्रतिनिधी)-जालना शहरातील नागरी प्रश्न अत्यंत उग्र रूप धारण करू लागले आहेत. नुकत्याच काही दिवसापूर्वी जालन्यातील भवानीनगर येथील रस्त्याने जाणार्या एका चिमुकल्या सात वर्षाच्या मुलाला सात-आठमोकाट कुत्र्यांनी घेरुन हल्ला केला. या मोकाट कुत्र्यांनी त्याचिमुकल्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आहे. चिमुकल्याच्या शरीरावर झालेला जखमांवर १६० टाके पडले. मात्र सुदैवाने तो बचावला. ही घटन जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी महानगर पालिकेच्या आवारात सांगितली तेंव्हा सर्व वातावरण स्तब्ध व भावनिक झाले होते.तर शहरात रस्त्याच्या मधोमध असणार्या विद्युत खांबांनीही एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला. यासह पाणी, स्वच्छता असे नागरी प्रश्न घेऊन शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आपल्या सहकार्यांसह महानगरपालिकेवर धाव घेतली. तेथे शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली व शहरातील नागरी प्रश्नांकडे पालिकेचे होणारे दुर्लक्ष यावर होळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बोंबा ठोकल्या. यावेळी
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम
खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, विधानसभा संघटक दीपक रणनवरे,वैद्यकीयआघाडीचे डॉ.राजेश राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगल मेटकर, मंजुषा घायाळ, नगरसेवक विजय पवार, संदीप नाईकवाडे, माजी नगरसेवक जे.के. चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आक्रमकपणे घोषणा देऊन प्रशासनाने समस्या सोडण्याची जोरदार मागणी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीउपस्थित पालिकेचे अधिकारी सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे व प्रियंका राजपूत यांच्यावर समस्यांचा भडीमार केला. यावेळी अंबेकर म्हणाले की, जालना महानगरपालिकेला नागरिकांच्या जीवांचे काही देणे घेणेच राहिलेले नाही.काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण करीत आहेत. त्यावर वाहनाधारक धडकून एका निरापराध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही ते विद्युत खांब अजून हलवले नाहीत ते तात्काळ हलविण्यात यावेत.नागरिकांना दिले जाणारे पाणी अत्यंत अनियमित स्वरूपाचे दहा ते बारा दिवसाआड याप्रमाणे महिन्यात तीन वेळा तर वर्षभरात तीस ते पस्तीस दिवस देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत.तर पाणीपट्टी मात्र ७०० रुपयांवरून २ हजार ७०० केली असून वसुलीही नोटीसा देऊन सक्ती न करण्याची मागणी करुन उन्हाळा सुरू झाला असल्याने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली. शहरातील अनेक विभागांमध्ये कचर्यांचे मोठ-मोठे ढीग साचले आहेत, नाल्या कुटुंब भरून रस्त्यावर वाहत आहेत. त्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती आहे. अनेक विभागात घंटागाडी अत्यंत अनियमितपणे जाते त्यांचेही योग्य नियोजन करून स्वच्छता करण्यात यावी असे अंबेकर म्हणाले.शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूने असलेले ड्रेनेज त्यावर ढापे नसल्याने अत्यंत धोकादायक बनलेले आहेत. त्यामुळे पादचारी, जेष्ठ नागरिक व लहानमुले यांना धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे बसलेली असतात. त्यांच्यामुळे अनेक दुचाकीस्वार, सायकल चालक व वाहनचालकांना अनेक वेळा अपघात व वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असल्याने त्याचाही बंदोबस्त पालिकेच्या वतीने करण्यात यावा. शहरालापाणीपुरवठा करणार्या जलकुंभांची सुरक्षा ही वार्यावरच आहे. नूतन वसाहत भागातील जलकुंभात मागील महिन्यांपूर्वी कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला होता व तसाच पाणी पुरवठा नागरिकांना करण्यात आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. शहरातील अशा सर्व जलकुंभांना संरक्षण भिंत असावी, वॉचमन व सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याची मागणी केली.अशी व्यवस्था न केल्यास हजारो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीभीती व्यक्त केली.शहरातील चंदनझिरा,नूतनवसाहत, कन्हैयानगर भागातील नागरिकांना स्मशानभूमीचीअत्यंत गरज आहे. अनेक वर्षापासून त्यांची मागणी असतानाही पालिकेने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. येथील नागरिकांना तीन ते चार किलोमीटर अंतरावर जाऊन अंत्यविधी करावा लागत असल्याने त्यांची मागणी,तात्काळ सोडविण्याची मागणी जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी केली. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकही उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. हातात मागन्यांचे फलक घेऊन समस्या सोडवण्याची जोरदार मागणी करीत होते.प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याचा काही उपयोग न झाल्याने आजशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवेदन न देता यापूर्वी दिलेल्या निवेदनांची होळी केली व डफडे वाजवून प्रचंड बोंबाबोंब करूनपालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाने ही महापालिका प्रशासनाला जाग आली नाही तर शहरात यापेक्षाही मोठे आंदोलन उभे केले जाईल.असा इशाराही जिल्हाप्रमुख Dांबेकर यांनी महानगर पालिका प्रशासनाला दिला.यावेळी दलित आघाडीचे शहरप्रमुख संजय रत्नपारखे, वसीम खान, चेतन भुरेवाल,सखावत पठाण, जीवन खंडागळे, किशोर नरवडे, राजू वैद्य, तुकाराम भुतेकर,गणेश लाहोटी, दर्शन चौधरी, आकाश टेकुर,अजय रोडीये, सुनील तोडकर,पाऊलबुद्धे,सोनाजी खांडेभराड, योगेश जाधव,संतोष क्षत्रिय,इम्रान,शिवा मुळे, बळीराम शिंदे, जितेंद्र रत्नपारखे, गौतम साळवे, चंदा चव्हाण,रूपाली पवार, रंजना सरोदे, ज्योती वाडेकर, अंजली आठवले, प्रतीक्षा गवळी,राजेश शेळके,राजू इंगळे,नितीन वानखेडे, वसंत मुंडे, मदनराव खरात,कैलास मिसाळ,गणेश तरासे, नितीन वानखेडे,रामेश्वर कुरील, कांतराव कुंडलकर,ज्ञानदेव पोटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.
००००००००००००००
फोटो ओळी…..१ ते ३- जालना शहरातील नागरी समस्यांसाठी आज जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या उपस्थितीत महानगर पालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले.



