vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

 

जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा रविवार दि.23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत त्यांच्या गावच्या शाळेतील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी केले आहे.

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत परीक्षा ही ऑफलाईन पध्दतीने होणार असून प्रश्नपत्रिका 150 गुणांची असणार आहे. यात वाचन 50 गुण, शब्दलेखन 50 गुण आणि संख्यात्मक ज्ञानासाठी 50 गुण अशी गुणांची विभागणी करण्यात आली आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 51 गुण आवश्यक आहेत. उमेदवारांना परीक्षेसाठी निळा व काळा शाईचा पेन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात परीक्षेसाठी एकुण 970 परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत. परीक्षेत दिव्यांग उमेदवारांना 60 मिनिटांचा वेळ अधिकचा देण्यात येणार आहे. असे शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली काय म्हणाले राज ठाकरे? भाषा संपली तर… रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन

मुंबईतील झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावी विधानसभा क्षेत्र मतदार संघात तिरंगी लढत..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील  धारावी भागामध्ये  भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या उपस्थितीत   मार्शल आर्ट इंटरनॅशनल स्पोर्ट, अकॅडमी चे उद्घाटन  संपन्न

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर-स्वच्छता कर्मचाऱ्यांनी राबविले मतदान जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकासाठी आचारसंहिता भंगासंदर्भात,तक्रारींसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

नवी मुंबई :शिवसेनेकडून पैशांची ऑफर, षडयंत्र रचायला भाग पाडलं; महिलेकडून गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार अखेर मागे…