अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई
नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई – काळाची पावले ओळखून भविष्यात AI तंत्रज्ञान प्रशासनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान अवगत करावे असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले..
प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग आणि विश्वनिकेतन व्यवस्थापन उद्योजकता संस्था खालापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने AI तंत्रज्ञानाचा प्रशासनात वापर या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रादेशिक उपायुक्त सोळंकी बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या प्रत्येक विभागात 100 दिवस उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
प्रशासनात AI तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करू शकतो या विषयावर विश्वनिकेतन संस्थेचे प्राध्यापक अंकुश पवार ,मोकल ,यश यांनी कार्यशाळेत उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.. यावेळी मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर ,रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व कर्मचारी उपस्थित होते.