vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून खरोळा येथील पिंपळे परिवाराचे सांत्वन

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून खरोळा येथील पिंपळे परिवाराचे सांत्वन

         राज्य प्रतिनिधी -अचानकपणे वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊसात विजेचा शॉक लागून झालेल्या दुर्देवी घटनेत भाजपाचे कार्यकर्ते खरोळा येथील शेतकरी महारूद्र (राजाभाऊ) बसवंतआप्पा पिंपळे यांचे दुःखद निधन झाल्याचे समजल्याने भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी गुरुवारी खरोळा येथे जाऊन पिंपळे परिवाराचे सांत्वन केले व धीर दिला.

        अत्यंत सामान्य कुटुंबातील राजाभाऊ पिंपळे यांच्या अकाली निधनाने कुंटूबावर मोठे दुःख कोसळले आहे. भाजपाचे नेते आ श्री रमेशआप्पा कराड यांनी गुरुवारी दुपारी खरोळा येथे जाऊन पिंपळे परिवाराची भेट घेतली. यावेळी मयत महारुद्र यांचे वडील बसवंतआप्पा पिंपळे, आई मन्याबाई, पत्नी मिनाबाई, मुलगा ‌‌अवधूत, मुलगी मेघा ‌‌आणि अमृता यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन सांत्वन केले व वैयक्तिक मदत केली. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून पिंपळे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी आ कराड यांच्यासमवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, पंचायत राज सेलचे नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.

          यावेळी बाळूअप्पा हेने, हनुमंतकाका राऊतराव, प्रताप राऊतराव, राजकुमार मानमोडे, ‌ मोहन सुभान राऊतराव, विजयकुमार शिंदे, ‌‌ केदारनाथआप्पा पिंपळे, केदारनाथ सपकाळ, गोविंद आडतराव, रमाकांत फुलारी, सत्यवान राऊतराव, ‌संगमेश्वर ततापुरे, सोमनाथ चापोले, डॉ महेंद्र पिंपळे, राजेश्वर उकर्डे, पुंडलिक आदुडे, वैजनाथ भालेकर, बालासाहेब आडतराव, ‌संजय पिंपळे, राहुल कपाळे, ‌ईबा पिंपळे, भागवत अडतराव, सिद्धू मदने, मच्छिंद्र कपाळे, बाळू पाटील, विश्वंभर रवळे, जगन्नाथ रवळे, ‌‌संदीप पिंपळे, ‌‌मंगेश पिंपळे, ‌वैजनाथ घोडके, पद्माकर मोतमफळे‌‌, ‌‌अंकुश डोके, बालाजी बावचकर. ज्ञानोबा भोपी, भय्या दीक्षित ‌यांच्यासह इतर अनेक जण होते

संबंधित पोस्ट

बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये; कायद्यात कडक तरतूद करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी

13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 55 हजार 981 प्रकरणे निकाली काढण्यात यशठाणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन प्रकल्पाचे लोकार्पण

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta