पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पुणे प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून 2000 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठी विविध ठिकाणी सायरन वाजवून नदीपात्रात येऊ नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे.
खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून 19 जून रोजी दुपारी 1 वाजता 2 हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे
मावळ, लोणावळा, कामशेत या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसत आहे.