vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने खडकवासला धरणातून  पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून 2000 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठी विविध ठिकाणी सायरन वाजवून नदीपात्रात येऊ नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे.

खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून 19 जून रोजी दुपारी 1 वाजता 2 हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या  विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे

मावळ, लोणावळा, कामशेत या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसत आहे.

00000

संबंधित पोस्ट

नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

vishwatmaklokswamivarta

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थींना द्यावा- खासदार विशाल पाटील- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा