vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

            मुंबई, प्रतिनिधी: मालेगाव सह राज्यातील सर्वच अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.मालेगाव येथील अनधिकृत कत्तलखान्यांच्या संदर्भात विधानपरिषदेत सदस्य विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मालेगावमधील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागात कत्तलखान्यांची स्थिती चिंताजनक आहे. अनधिकृतपणे चालणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई करणे अपेक्षित असून, काही ठिकाणी कारवाई झाली आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाला आणखी कडक सूचना दिल्या जातील आणि जेथे अवैध कत्तलखाने सुरू आहेत, तिथे तातडीने कारवाई करण्यात येईल.

सणांच्या दिवशी महानगरपालिका व नगरपालिकांच्या माध्यमातून काही ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारले जातात. अशा ठिकाणी वाळू-मातीचा वापर करून रक्तवाहन थांबवण्याची काळजी घेतली जाते, असेही मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

 मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी सोडल्याचा पुरावा सदर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याबद्दल चौकशी करून कारवाई केली जाईल. मोसम नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने 10 कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातील 5 कोटी 26 लाख रुपये मालेगाव महानगरपालिकेला देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

आज दुसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांचा संप सुरुच; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन

मुंबईतील माटुंगा विभागात असलेल्या पायनर सभाग्रहात आयोजित घरगुती हिंसाचार  या विषयावर होणाऱ्या* शब्द हिताचे, हात मदतीचा,या मुद्द्यावर  साै. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन पर विचार मांडण्यात आले आणि महिलांना मदतीचा संदेश देण्यात आला.

एसएससी परीक्षा महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण 100% जलसमृद्ध

जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश