vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

 

मुंबई प्रतिनिधी-   मुंबई- नवजात शिशूचे संगोपन प्रत्येक आई वडिल जीवापलीकडे करतात तसेच संगोपन प्रत्येक झाडाच्या रोपट्याचं झाल पाहिजे. झाड जगली तर मनुष्य जगेल, पाणी वाचेल तर मनुष्य वाचेल, उर्जाची बचत केली तर मनुष्य वाचेल अर्थात पर्यावरणाचं रक्षण केले पाहिजे तरच मनुष्य जीव वाचेल अन्यथा झाडांची हत्या करून त्या जागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या तर मनुष्य जीवन धोक्यात आले आहे. आणि ही समस्या आपल्या देशासह जगाची झाली आहे अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच नवजात शिशूचे संगोपन आईवडिल करतात तसेच संगोपन झाडांच्या रोपट्याचं झाल पाहिजे असा आगळावेगळा उपक्रम राबवित असताना इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संयोजक के.रवि दादा यांनी सांगितले. हा उपक्रम जे .जे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, हॉस्पीटल मोहम्मद अली रोड, नागपाडा येथे राबविण्यात आला. त्यावेळी नवजात शिशूचे आणि पालकांचे स्वागत करून एक झाड, टॉवेल, टोपी आणि मिठाई इत्यादीखाऊचे बाळाचे किट आणि पालकांसह बाळांना देण्यात आले.   यावेळी इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संयोजक के रवि दादा, मंत्रालय सहसचिव अशोक आत्राम,अभिनेते अली खान, कमल खान, राज्याचे माजी सहसचिव प्रीतम आठवले, समाजसेविका संगीता भाटिया, परब आदी मान्यवर उपस्थितीत होते. यापुढे बोलताना के. रवि दादा म्हणाले की, अनेक ठिकाणी निसर्गाची मोठे प्रमाणात हानी केली जात आहे मुंबईसारख्या शहरात झाडांची कत्तल करून मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. शहराच्या विकासासोबत निसर्गाच्या होणाऱ्या हानीचाही विचार केला पाहिजे. अन्यथा भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी निसर्गाचा विध्वंस थांबवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.

संबंधित पोस्ट

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आताप्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी..

vishwatmaklokswamivarta

आज 14 डिसेंबर पासून नवी मुंबई वाशीत “महालक्ष्मी सरस -2024” चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांची छेडानगर सुब्रमण्यम समाज मंदिराला भेट;चंडी महायज्ञात दिली पूर्णाहुती; पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांचे संबोधन

vishwatmaklokswamivarta

सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान*

vishwatmaklokswamivarta

मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका;वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच! वकीलांसाठी इंग्रजाळलेला काळा ड्रेसकोड चालतो, तर मंदिरातील ड्रेसकोडविषयी आक्षेप का ? – ‘रणरागिणी’चा सवाल

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी – डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta