vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

 

मुंबई प्रतिनिधी-   मुंबई- नवजात शिशूचे संगोपन प्रत्येक आई वडिल जीवापलीकडे करतात तसेच संगोपन प्रत्येक झाडाच्या रोपट्याचं झाल पाहिजे. झाड जगली तर मनुष्य जगेल, पाणी वाचेल तर मनुष्य वाचेल, उर्जाची बचत केली तर मनुष्य वाचेल अर्थात पर्यावरणाचं रक्षण केले पाहिजे तरच मनुष्य जीव वाचेल अन्यथा झाडांची हत्या करून त्या जागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या तर मनुष्य जीवन धोक्यात आले आहे. आणि ही समस्या आपल्या देशासह जगाची झाली आहे अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच नवजात शिशूचे संगोपन आईवडिल करतात तसेच संगोपन झाडांच्या रोपट्याचं झाल पाहिजे असा आगळावेगळा उपक्रम राबवित असताना इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संयोजक के.रवि दादा यांनी सांगितले. हा उपक्रम जे .जे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, हॉस्पीटल मोहम्मद अली रोड, नागपाडा येथे राबविण्यात आला. त्यावेळी नवजात शिशूचे आणि पालकांचे स्वागत करून एक झाड, टॉवेल, टोपी आणि मिठाई इत्यादीखाऊचे बाळाचे किट आणि पालकांसह बाळांना देण्यात आले.   यावेळी इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संयोजक के रवि दादा, मंत्रालय सहसचिव अशोक आत्राम,अभिनेते अली खान, कमल खान, राज्याचे माजी सहसचिव प्रीतम आठवले, समाजसेविका संगीता भाटिया, परब आदी मान्यवर उपस्थितीत होते. यापुढे बोलताना के. रवि दादा म्हणाले की, अनेक ठिकाणी निसर्गाची मोठे प्रमाणात हानी केली जात आहे मुंबईसारख्या शहरात झाडांची कत्तल करून मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. शहराच्या विकासासोबत निसर्गाच्या होणाऱ्या हानीचाही विचार केला पाहिजे. अन्यथा भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी निसर्गाचा विध्वंस थांबवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त…गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन!संत-महंत, मंत्री यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक-धर्मनिष्ठ उपस्थित रहाणार!

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !**महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम**लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी !*

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु♦️२०२५ – २६ च्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या सादर 

मुंबई क्लायमेट वीक’च्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार