vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

जालना (प्रतिनिधी) – सामनगाव ते अंतरवाला आणि सामनगाव ते काजळा या दोन्ही प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रस्त्यांचे तात्काळ बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर रस्त्यांचे काम सुमारे १५ ते १८ वर्षांपूर्वी झाले असून, त्यानंतर योग्य देखभाल न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढतो, तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणी व गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात *राहुल राजपुत, लंकेश्वर चिरखे, प्रल्हाद नेमाने, केशव मालोदे, अर्जुन पडुळ, संदिप डोंगरे, विजय गायकवाड, गणेश भालेराव, सोपान शिंदे, अनिल बुंदेले, संदीप कावळे, आदी* यासाठी अपर जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले असून, त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने विलंब न लावता दोन्ही रस्त्यांचे काम तात्काळ हाती घेऊन सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन 

महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर; स्थानिक उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन*

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta