
शेलूद येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा संपन्न
बुलडाणा, प्रतिनिधी : येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा मौजे शेलूद येथे प्रगतशील शेतकरी स्वप्नील महाजन यांच्या शेतावर पार पडली. सभामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचे महत्त्व, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संवर्धन, पिक लागवड खर्चात बचत, जमिनीची धूप रोखणे आणि पर्यावरण संतुलन याविषयी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. दीपक जोशी यांनी शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे सेंद्रिय कर्ब वाढून शेती उत्पन्नात भर पडते, असे सांगितले.



